Nation

कंदलगाव ग्रामपंचायत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभा

शासनाच्या विविध योजनांची माहिती, मात्र लोकप्रतिनिधींची अल्प उपस्थिती.

कंदलगाव, दक्षिण सोलापूर ( प्रतिनिधी – राहुल उडाणशिव )
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कंदलगाव ता. द सोलापूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत गावातील पर्यावरण, शेती आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मात्र, एकूण १३ सदस्यांपैकी केवळ ४ सदस्यांनीच या सभेला हजेरी लावल्याने लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. पर्यावरण दिन आणि गावच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही विशेष ग्रामसभा लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरली. कंदलगाव ग्रामपंचायतीच्या एकूण १३ सदस्यांपैकी केवळ ४ सदस्य उपस्थित राहिल्याने, लोकप्रतिनिधींना गावच्या विकासकामांचे आणि पर्यावरण संवर्धनाचे गांभीर्य नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
.

​शासकीय योजनांची दिली सविस्तर माहिती.

​या विशेष ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी एस. एस. राठोड आणि कृषी अधिकारी कोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध लोकोपयोगी आणि कृषीविषयक योजनांची सविस्तर माहिती दिली. गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

​पर्यावरण रक्षणासाठी ‘लोकतंत्र डिजिटल न्यूज’चे कार्यकारी संपादक राहुल उडाणशिव यांचे आवाहन

​याप्रसंगी पत्रकार तथा ‘लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी’ न्यूज चॅनलचे उपसंपादक राहुल उडाणशिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाढत्या जागतिक तापमानावर (Global Warming) चिंता व्यक्त करत त्यांनी गावपातळीवर पर्यावरण रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.
​आपल्या मार्गदर्शनात उडाणशिव यांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकत एक कुटुंब एक झाड ही संकल्पना प्रभावीपणे मांडली.
​वृक्षारोपण व सिंचन – केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, योग्य सिंचन व्यवस्थेद्वारे ती जगवणे काळाची गरज आहे.

​प्लास्टिक व घनकचरा व्यवस्थापन – प्लास्टिकचा वापर टाळून गावाने कचरा व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे.

​हागणदारी मुक्त गाव – गाव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे आजही उघड्यावर शैचास बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे व शौचालयाचा वापर नागरिक करत नसल्याचे पत्रकार उडाणशिव यांनी त्यांनी निदर्शनास आणून दिले

याप्रसंगी उपस्थित ग्रामविकास अधिकारी एस एस राठोड कृषी अधिकारी संगम कोरे, उपसरपंच अमित नरोटे, सरपंच प्रतिनिधी धनेश कडते, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, सायप्पा कांबळे, राजकुमार उडाणशिव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button