Nation

माळशिरस कॉंग्रेस तालुका सरचिटणीस धनाजी मस्के करणार झंजेवाडी ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण  

माळशिरस, दि २ मे (द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क) मळशिरस तालुक्यातील झंजेवाडी ग्रामपंचायत विरोधात भारतीय कॉंग्रेस आय चे तालुका सरचिटणीस धनाजी म्हस्के हे विविध मागण्याकरीता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे , याबाबतचे पत्र त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे . खालीलप्रकरच्या विविध मागण्यांसाठी ते आमरण उपोषणाला बसणार आहेत .

१. जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी व्हावी

२. तात्काळ पिण्याचे व वापराचे पाणी चालू करण्यात यावे ( एकनाथ (आबा) मारकड तालीम जवळील टाकीचे) तसेच दररोजच्या दररोज पाणी चालू करणार व पाणी घरोघरी देणार याची हमी देण्यात यावी

३. ग्रामपंचायत आवारात व ग्रामपंचायत मध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावीत

४. ग्रामपंचायत रोज उघडण्यात यावी

५. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात यावी

६. ग्रामपंचायतचे सर्व दाखले व ग्रामपंचायत कामकाज झंजेवाडी कार्यालयातूनच व्हावे

७. ग्रामपंचायत कार्यालयातील कम्प्युटर प्रिंटर चालू करण्यात यावा

८. ग्रामपंचायत अधिकारी/ग्रामसेवक नेमून दिलेल्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये हजर असावा व त्यांची बायोमेट्रिक हजेरी व्हावी

९. घरकुला मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी घरकुलाचे सर्व निकष तपासूनच लाभ देण्यात आला का याची चौकशी व्हावी तसेच गरजूंना घरकुलाचा लाभ मिळावा

१०. ग्रामपंचायतचे क्षेत्र (गावठाण) मोजणी होऊन मिळाली

११. सिटी सर्वे करून मिळावा

१२. 24 तास सिंगल फेज लाईट मिळावी तसेच सिंगल फेज चे काम पूर्ण करण्यात यावी

१३. पुण्यप्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याजवळील टाकीजवळ बांधलेल्या पत्रा शेड या कामाचा उद्देश व त्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी व ते काम ज्या ठिकाणी करायचे त्या ठिकाणी तात्काळ करण्यात यावी

१४. ग्रामपंचायत विकास काम करत असताना सर्वसामान्यांच्या जागेचे संबंधितांच्या परवानगीशिवाय जागा ताब्यात घेण्यात येऊ नये

१५. ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय चालू करावे

१६. ग्रामसभा घेण्यात यावी

गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून या मागण्यांसाठी ते प्रशासनाकडे/ग्रामपंचायत/पंचायत समितीकडे तोंडी व लेखी स्वरूपात पाठपुरावा करत आहेत , परंतु कोणती दखल घेतली गेली नाही म्हणून ते लोकशाही मार्गाने आमरण उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे सांगितले . या उपोषणादरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची खबरदारी आम्ही घेऊ ये त्यांनी प्रशासनास कळविले आहे तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी विनंती त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला परवानगी मिळण्यासाठीही पत्र दिले आहे.

या अनेक मागण्यांसाठी दि ६ मे पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत , प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button